बसलोच लिहायला कधी,
तर दिसतेस तू,
बदलताच श्वास माझे,
तर हसतेस तू,
थांबलोच चुकून कधी,
तर रुसतेस तू,
हरवताच शब्ध माझे,
तर आठवतेस तू,
तरीही आपल्याच सावल्यांना का शोधतेस तू…
भरलीच भावनांची ओंजळ कधी,
तर देते साथ आसवांची ,
तुटलीच आपल्यांची नाळ कधी,
तर देते उब मायेची,
विरताचा नशिबाचे भोग कधी,
तर देते जिद्द जगण्याची,
तरीही आपल्याच पावलांना का शोधतेस तू…
झुळूक येताच गंधाची,
रमवते माझ्या मनाला,
वादळाची होताच सकाळ,
आवळते माझ्या पाषानां,
ना कळे गाणे तरीही,
साथ देते माझ्या रडण्याला,
तरीही आपल्याच भावनांना का शोधतेस तू…
No comments:
Post a Comment